सायबर गुन्हे आणि मानवी भावना

सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. फ्रॉड करणारे रोज नवीन क्लृप्त्या लढवून लोकांचे पैसे पळवतात आणि या घटना वाढतच आहे. कधी विचार केला आहे का, की हे सायबर गुन्हेगार आपल्या मानवी भावनांचा, विचार करण्याच्या पद्धतीचा आधार घेऊन आपल्याला फसवतात? आर्थिक सायबर गुन्ह्यांना बळी पडताना एखाद्याच्या डोक्यात काय विचार येत असतील. फसवणूक होत असताना माणसाला स्वतःला का लक्षात येत नसेल याचा विचार मी करत होतो.